मराठवाड्यावर अवकाळी संकट: १७ दिवसांच्या वादळी पावसात २७ जणांचा मृत्यू, शेतीचं मोठं नुकसान
मराठवाड्यावर अवकाळी संकटामुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू
मुंबई, (प्रतिनिधी): Unseasonal Crisis in Marathwada मराठवाड्यावर अवकाळी संकटामुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू; महाराष्ट्रभर अवकाळी पावसाने थैमान घातले असून मराठवाडा विभागात मागील १५ पेक्षा अधिक दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केलं आहे. प्रचंड वादळी वारे, गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट निर्माण झालं आहे. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी मे महिन्यात होणाऱ्या उष्णतेमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यावर अवकाळी संकटामुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
(Unseasonal crisis in Marathwada: 27 people died in 17 days of torrential rains, huge damage to Agriculture) दिनांक ३ मेपासून आकाश सतत भरून येत असून, मुसळधार पावसासोबतच वीज पडण्याच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत २७ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतल्यास बीड आणि नांदेडमध्ये प्रत्येकी ५ जणांचा, जालना जिल्ह्यात ७ जणांचा, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३, हिंगोलीमध्ये २, परभणीत १, लातूर आणि धाराशिवमध्ये प्रत्येकी २ जणांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
या काळात ३९१ जनावरांचा मृत्यू झाला असून, ४ हजारांहून अधिक हेक्टरवरील उन्हाळी आणि बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक वातावरणात होणारे बदल, विजांचा भीषण कडकडाट आणि पावसाच्या संततधारेमुळे शेतकरी हतबल झाला आहे.
ही बातमी देखील वाचा : इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६; नवीन वेळापत्रक २२ मे रोजी जाहीर होणार, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती
या संकटामुळे मराठवाड्यातील बळीराजाची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. पीकपद्धतीवर होणाऱ्या या घातक परिणामामुळे आर्थिक व मानसिक दडपण वाढले असून, शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राज्य शासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी ठोस मदत उभी करावी, असा आक्रोश सध्या मराठवाड्यातून उमटत आहे.